रविवार, 31 अगस्त 2008

विदर्भात दोन दिवसांत ९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नागपूर, ३१ ऑगस्ट - विदर्भात गेल्या दोन दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहीती विदर्भ जन आंदोलन समितीने रविवारी येथे दिली.
यामध्ये यवतमाळमध्ये तीन, बुलढाणा आणि चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर अमरावती आणि नागपूरात प्रत्येकी एका शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली.
यवतमाळमधील दोन शेतकऱ्यांनी तसेच नागपूरातील व चंद्रपूर जिल्ह्यातील एक अशा चौघा शेतकऱ्यांनी शनिवारी बैल पोळा सणादिवशीच आपली जीवनयात्रा संपवली.

कोई टिप्पणी नहीं: