बुधवार, 27 अगस्त 2008

हिंदुच्‍या हत्‍येवर कॉंग्रेस शांत का?- बाळासाहेब

मुंबई, २७ ऑगस्ट-शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ओरीसात नक्षलवाद्यांकडून स्वामी लक्ष्मणानंद यांच्‍या हत्येच्‍या घटनेची कडक शब्‍दात टिका केली असून ‘माओवाद हा मुस्‍लीम दहशतवादा इतकाच गंभीर असल्‍याची टिका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील संपादकीय लेखात ठाकरे यांनी म्‍हटले आहे, की 85 वर्षीय लक्ष्मणानंद ओरीसात ख्रिस्‍ती मिशन-यांकडून गरीब आदिवासींच्‍या धर्मांतरणास विरोध करीत असल्‍यामुळेच त्‍यांची हत्या केली गेली आहे.
ठाकरे यांनी धर्मनिरपेक्षवादी असल्‍याचा दावा करणा-या कांग्रेस, राष्ट्रवादी, डावे आणि बहुजन समाज पार्टीच्‍या नेत्‍यांना लक्ष्‍य करताना टीका केली आहे, की ओरीसात लक्ष्मणानंद यांची हत्या केल्‍याच्‍या घटनेचा या पक्षांनी निषेध का केला नाही.

कोई टिप्पणी नहीं: