रविवार, 3 अगस्त 2008

दुसऱ्या कसोटीत भारताची "जय' - श्रीलंकेचा १७० धावांनी पराभव

गॉल, ३ अगस्ट - हरभजन, ईशांत शर्मा आणि अनिल कुंबळे यांच्या भेदक गोलंदाजीने श्रीलंकेच्या फलं दाजीच्या चिंधड्या उडवत भारताने दुसरी कसोटी जिंकून मालिकेत बरोबरी साधली। सामनावीर पुरस्कार धडाकेबाज द्विशत ठोकणाऱ्या वीरेंद्र सेहवागला मिळाला.
तत्पुर्वी, भारताने कालच्या ४ बाद २०० वरून आज आपल्या डावाची सुरूवात केली. मात्र गां गुली १६ धावा तर लक्ष्मण १३ धावाकरून तंबूत परतले. त्यानंतर दिनेश कार्तिक २० धावांची भर घालून चालता झाला. नंतर आलेल्या अनिल कुंबळे २, हरभजन ११, ईशांत शर्मा ० आणि जहीर खान १ (नाबाद) यांनी केवळ मैदानावर हजेरी लावण्याचे काम केल्याने भारताचा दुसरा डाव २६९ धावांत आटोपला.
भारताच्या ३०६ धावांचे आव्हान घेवून मैदानात उतरलेल्या श्रीलंकेला सुरवातील हरभजन, ईशा ंत शर्मा आणि जहीर खानने हादरे देवून अडचणीत आणले.
सलामीला आलेल्या व्हंडोर्टला (१०) हरभजनने बाद करून श्रीलंकेला पहिला हादरा दिला। त्यानंतर वर्नपुराला ईशांत शर्माने शुन्यावर, संघकाराला एकवर जहीर खानने आणि जयवर्धनेला ५ वर ईशांत शर्माने तंबूत धाडून श्रीलंकेची अवस्था दयनीय केली.
दुसरीकडे समरविराने (नाबाद ६७) एक बाजू टिकवून धरली। त्याला दिलशानने (३८ धावा) चांगली साथ दिली. मात्र ईशांत शर्माने दिलशानला बाद केल्यानंतर फलंदाजीला गळती लागली. दिलशाननंतर आलेले जयवर्धने (४ धावा), चामिंडा वास (०), कुलाशेखरा (१), मेंडीस (२) आणि मुरलीधरन (०) स्वस्तात परतल्याने श्रीलंकेचा दुसरा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. आणि भारताने तब्बल १७० धावांनी विजय मिळवत, पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढला.
भारतातर्फे हरभजनने ५१ धावांत ४, ईशांत शर्माने २० धावांत ३, अनिल कुंबळेने ४१ धावांत २ तर १८ धावांत १ मोहरा टिपला.
तीन कसोटींच्या मालिकेत भारत आणि श्रीलंका यांनी प्रत्येकी एक कसोटी जिंकून बरोबरी साधली आहे.

कोई टिप्पणी नहीं: