सोमवार, 4 अगस्त 2008

राजीवजींच्या हत्येचा पश्चात्ताप होतोय!

मुंबई, ४ अगस्ट- ' राजीव गांधी हे महान नेते होते. त्यांच्या हत्येमुळे देशाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या हत्येच्या कटात सहभागी झाल्याचा मला मोठा पश्चात्ताप होत आहे,' असे नलिनी श्रीहरन हिने म्हटले आहे. मात्र हत्येच्या प्रमुख सूत्रधाराला काहीच शिक्षा झाली नसल्याबद्दल तिने खंत व्यक्त केली आहे.
नलिनी हिने अन्य चार जणांसह १९९१ साली राजीव गांधी यांच्या हत्येचा कट रचला। दुदैर्वाने तो यशस्वी झाला. त्याबद्दल आता आपल्याला प्रचंड पश्चात्ताप होत आहे, असे तिने म्हटले आहे. 'पीटीआय' या वृत्तसंस्थेला ई मेलद्वारे दिलेल्या मुलाखतीत तिने हे नक्राश्रू ढाळले आहेत. हत्येचा खरा सूत्रधार पकडला गेला का, असे विचारले असता, 'खरे सूत्रधार सिवारसन, सुबा आणि धनू हे त्या बॉम्बस्फोटातच ठार झाले. धनू तर स्वत:च मानवी बॉम्ब होती. त्यामुळे त्यांना शिक्षा होणे शक्यच नव्हते,' असे काहीसे गोलमाल उत्तर तिने दिले. एलटीटीईचा फोटोग्राफर एस. हरीबाबू यानेच या कटाची माहिती उघड केली होती.
हत्येनंतर महिन्याभरात अटक झालेल्या नलिनीला मृत्यूदंड झाला होता. मात्र गरोदर असल्यामुळे सोनिया गांधी यांच्या मध्यस्थीनंतर तिची शिक्षा कमी करून जन्मठेप करण्यात आली. काही दिवसांपूवीर्च प्रियांका गांधी यांनी तुरुंगात नलिनी यांची भेट घेतली होती. त्यानंतर तिचे मतपरिवर्तन झाल्याचे सांगितले जाते.

कोई टिप्पणी नहीं: