सोमवार, 4 अगस्त 2008

आरक्षणाच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बस पेटवली

उस्मानाबाद, ४ अगस्ट - मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून संभाजी ब्रिगेड संघटनेच्या आंदोलनकर्त्यांनी येथून १५ कि।मी. अंतरावर असलेल्या हिंग्लजवाडी गावात नागपूर-पंढरपूर बस पेटविली.
सोमवारी दुपारी एकच्या सुमारास संभाजी ब्रिगेडच्या काही आंदोलनकर्त्यांनी नागपूर- पंढरपूर बसवर दगडफेक करत बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविले आणि बसला आग लावली. या आगीत बस पूर्णतः: जळून खाक झाली. या गोंधळादरम्यान बसमधून उतरताना एक महिला प्रवासी किरकोळ जखमी झाली. बस पेटविल्यानंतर त्याठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीची पत्रके टाकून आंदोलनकर्ते पसार झाले.

कोई टिप्पणी नहीं: