रविवार, 20 जुलाई 2008

मराठी विद्यार्थ्यांना प्रवेश न मिळाल्यास आंदोलनाची पुनरावृत्ती - राज ठाकरेंचा इशारा

पुणे - महाराष्ट्रातील शिक्षणसंस्थांनी कायद्यानुसार ८५ टक्के महाराष्ट्रातील मुलांना प्रवेश दिलाच पाहिजे. या संस्थांचे प्रवेश पार पडून याद्या जाहिर होईपर्यंत आम्ही शांत राहू. मात्र, त्यामध्ये मराठी मुलांना प्रवेश मिळाले नाहीत, तर पुन्हा या आंदोलनाची पुनरावृत्ती होईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
आमच्या कार्यकर्त्यांना तडीपार करून किंवा तुरुंगात पाठवून हे आंदोलन थांबेल, असे वाटत असेल, तर तो भ्रम आहे, पाचशे कार्यकर्ते अटक झाले, तर पाच हजार कार्यकर्ते उभे राहतील, असेही त्यांनी बजाविले.
दरम्यान, महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिफारशी केल्या असतील, तर त्यांना पदावरून काढून टाकू, असे ते म्हणाले.

कोई टिप्पणी नहीं: