ममता बॅनर्जींच्या समर्थकांनी "नॅनो'कडे जाणाऱ्या रस्त्यावर झोपून येणाऱ्या कामगारांना कंपनीत प्रवेश करु दिला नाही.
हिंसाचाराच्या भीतीने येथील कर्मचाऱ्यांनीही कंपनीच्या आवारात येणे टाळले.
या प्रकल्पासाठी घेतलेल्या जमीनीपैकी चारशे एकर जमीन शेतकऱ्यांना परत करावी, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसने केली. ही जमीन शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने घेतली गेली आहे, असे तृणमूल कॉंग्रेसचे मत आहे.
रतन टाटा मात्र अशी कोणतीही तडजोड करण्यास तयार नाहीत. किंबहुना कामात अशा प्रकारचे अडथळे येत असतील आणि हिंसाचार सुरुच राहणार असेल तर आपण हा प्रकल्प दुसरीकडे हलवू, असा इशारा रतन टाटा यांनी दिला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें