मुंबई, ३० ऑगस्ट- भटक्या कुत्र्यांना ठार मारावे की त्यांचे निर्बिजीकरण करून त्यांना निवा-यात सोडून देण्यात यावे, याबद्दल मुंबई हायकोर्टाच्या दोन खंडपीठांमध्ये मतभेद झाल्याने ते तीन न्यायमूर्तीच्या पूर्णपीठापुढे सुनावणीला गेले असून त्याची नियमित सुनावणी पुढच्या शुक्रवारपासून सुरू होणार आहे.
या प्रकरणी मुंबई हायकोर्टाचे तत्कालिन मुख्य न्या. एम. बी. शहा यांच्या खंडपीठाने कुत्रे मारण्यास मनाई करणारा निर्णय दिला होता. तर गोवा खंडपीठाचे न्या. पाटणकर यांच्या खंडपीठाने कुत्रे मारण्याच्या बाजूने निकाल दिला आहे. आता यावर न्या. एस. राधाकृष्णन, न्या. दिलीप भोसले व न्या. विजया कापसे-ताहिलरमानी यांचे खंडपीठ दर शुक्रवारी सुनावणी घेईल.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें