रविवार, 27 जुलाई 2008

स्फोटांनंतर आता राजकारणाला सुरुवात

नवी दिल्ली, २७ जुलै- केंद्रातील कॉग्रेस सरकारने दहशतवाद्यांविरोधात मवाळ भूमिका घेतल्यानेच देशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद वाढल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीने केल्यानंतर कॉग्रेसनेही आता त्याला जोरदार उत्तर देत भाजपने जरा संयम दाखवावा अशी प्रतिक्रिया दिल्याने या प्रकरणावरून दोन्ही पक्षात आरोपप्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.
केंद्र सरकारने सत्तेवर आल्यानंतर पोटा कायदा रद्द करून सर्वात मोठी चूक केली. यानंतरच दहशतवाद्यांना पाठबळ मिळाल्याचा आरोप भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केला आहे. सरकार दहशतवाद्यांप्रकरणी मवाळ भूमिका घेत असल्याचे ते म्हणाले.
यानंतर कॉग्रेस गटातूनही यावर तिखट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून प्रवक्ते विरप्पा मोईली यांनी भाजपने जरा संयमाची भूमिका घ्यावी आणि अशी वक्तव्ये टाळावीत असे मत व्यक्त केले आहे.

कोई टिप्पणी नहीं: