रविवार, 27 जुलाई 2008

मुंबई आणि इंदूरमध्ये हाय अलर्ट

मुंबई, २७ जुलै- जयपूर पाठोपाठ बेंगलूरू आणि अहमदाबादेत झालेल्या साखळी स्फोटांनंतर आता देशातील प्रमुख शहरांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
याअंतर्गत राज्य शासनाला निर्देश देण्यात आले असून, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासाठी दोनही राज्यात विशेष पोलिस दल नियुक्त करण्यात आले असून राज्यात प्रवेश करणाऱ्या सीमांवर सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलिसांनी बाजार, आणि गर्दीच्या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे. वर्दळीच्या ठिकाणी संशयित आढळल्यास त्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दहशतवाद्यांनी अहमदाबादमध्ये स्फोट करण्यापूर्वी मेल करत दिलेल्या धमकीत मुंबई आणि इंदूरला आगामी काळात आपले लक्ष करण्याची धमकी दिली आहे.

कोई टिप्पणी नहीं: