रविवार, 13 जुलाई 2008

ड्राय-डे मुळे मद्यपींचा गोराई-मनोरीकडे मोर्चा

मुंबई, दि. १४ : आषाढी एकादशी हा मद्यपींसाठी ड्राय-डे असल्यामुळे शहरातील बिअर बार व दारुची दुकाने बंद असतात. त्यामुळे वर्षाचे बाराही महिने ओल्या पार्ट्या झोडणाऱ्यांची मोठी पंचाईत होते. त्यामुळे मुंबई-ठाण्यातील तळीराम दरवर्षी ड्राय-डेच्या दिवशी आपला मोर्चा बोरिवली पश्र्चिमेकडील गोराई व मनोरी बीचकडे वळवतात. कारण या समुद्रकिनाऱ्यावरील सर्वच हॉटेल्स आणि रिसॉर्टवाले या तळीरामांची उत्तम बडदास्त ठेवतात.
पोलीस कारवाईतून सुटका करून घेण्यासाठी येथील हॉटेल्सचे मालक मद्यपींसाठी वेटिंग रुममध्ये सोय करून देतात. त्यामुळे दरवर्षी ड्राय-डेच्या दिवशी हे रिसॉर्टस्‌ ओसंडून वाहतात आणि तळीरामांची तहान शांत करतात.

कोई टिप्पणी नहीं: