टिटवाळा, दि.१४:वासींद येथे "भातसा'च्या पात्रात हजारो मासे मृत पावल्याचे ऐकल्यानंतर कल्याण ग्रामीण भागात नदीच्या पाण्यावर अवलंबून राहणाऱ्यांमध्ये कमालीची घबराट पसरली असून याच भागातील नदीकाठच्या रहिवाशांनी "भातसा' चे पाणी पिणे बंद केले आहे.
शहापूर तालुक्यातील वासींद गावात ९ जुलै रोजी भातसाच्या पात्रातील हजारो लहान मोठे मासे अचानक मृत पावल्याने परिसरातील रासायनिक कंपन्यांच्या दूषित पाण्याकडे बोट दाखविण्यात येत होते. परंतु शासकीय यंत्रणा अशा कारखान्यांची चौकशी करून कारवाई करण्याऐवजी चौकशी सुरू असल्याचे सांगत असल्याने सतत दूषित होणाऱ्या भातसा नदीतील पाण्यावर अवलंबून राहणाऱ्या कल्याण तालुक्यातील लोकांत चांगलीच घबराट पसरली आहे. कारण यापूर्वी अशाच प्रकारे एकवेळ खडवली येथील भातसाच्या पात्रात रसायन मिश्रीत तेलाचा तरंग पाण्यात आढळला होता. त्यावेळी सुद्धा प्रदूषण महामंडळ, तहसिलदार आणि शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेच्या जिवापेक्षा कारखानदारांची बाजू मांडून प्रकरण दाबले. म्हणून वासींद येथील घटनेतसुद्धा रासायनिक कंपन्यांचा हात असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. सुप्रसिद्ध लिबर्टी ऑईल मिलच्या दूषित रसायन युक्त पाण्याने ही घटना झाल्याचे लोक सांगतात. पण शासकिय यंत्रणा कबूल करण्यास तयार नाही. म्हणून लाखो लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समोर उभा राहिला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें