रविवार, 13 जुलाई 2008

ठाणे मॅरेथॉनवर पुन्हा पुण्याचे वर्चस्व

ठाणे, दि.१४ : ठाणे वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत यंदाही पुण्याने बाजी मारली आहे. पहिले पाच ही क्रमांकावर पूण्याच्या आर्मांने वर्चस्व मिळवित प्रथम क्रमांकाचा मान नीरजपाल सिंग याने तर महिलांची स्पर्धा उरणच्या निलम कदम हिने बाजी मारली.
ठाणे मॅरेथॉन ट्रस्टच्या वतीने पार पडलेल्या १९ व्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेतील मुख्य स्पर्धा (४२ किमी) पूण्याच्या आर्मीतील नीरज पालसिंग यांनी २ तास २३ मिनिटांनी पार करीत प्रथम क्रमांकाचा मान पटकावला, तर जयाभाई दत्तात्रय यांनी २ तास ३९ मिनिटे १२ सेकंदाने दुसरा क्रमांकाचा मान पटकावला. तसेच तिसऱ्या क्रमांकाच्या मानावे लागणारे नथुराम त्यांचा दुसरा क्रमांक २० सेकंदानी हुकला। तसेच चौथ्या क्रमांकावर शिवदान सिंग आणि पाचव्या क्रमांकावर प्रदीप कुमार हे पुणे आर्मीच्या नावांची नोंद आज झाली. विशेष म्हणजे पहिला आलेला नीरजपाल हा पहिल्यांदा पूर्ण मॅरेथॉन स्पर्धेत धावत होता.
दरम्यान १० किमी महिलांच्या स्पर्धेत प्रथम निलम कदम हिने ३२ मिनिटे ५२ सेकंदात अंतर पार करून विजय आपल्याकडे खेचून आणली. तर पश्चिम रेल्वेची वैशाली हजारे हिने ३४ मिनिटे ३१ सेकंदात अंतर कापील दुसरा क्रमांक पटकावला। तर सारती संस्थेंची मंजूळा पावेल हि तिसरी आली. निलम कदम हिने मागील वर्षा ठाणे महार्पौर स्पर्धा जिंकली होती.
या स्पर्धेतील मिश्र रेल्वे मॅरेथॉन स्पर्धा पश्चिम रेल्वेने मारली। तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर पूणेकरांना समाधान मानावे लागले. तसेच धम्माल ऑलिंपीक दौड स्पर्धा मुंबईच्या अमित नाचरे याने जिंकली. तर ठाण्याच्या विठ्ठल कांबळे याला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
या स्पर्धेचा शुभारंभ आंतरराष्ट्रीय नेमबाज अर्जुन पुरस्कार विजेते अशोक पंडित यांच्या हस्ते करण्यात आला। या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरलेल्या व्हीलचेअर्स स्पर्धा वाजिद कुरेशीने जिंकली असून दुसऱ्या क्रमांकावर सुरेश नाचाणे आणि तिसऱ्या क्रमांकावर सत्यप्रकाश तिवारी यांना समाधान मानावे लागले.
पहिल्यांदा धावलो आणि जिंकलो. नीरजपाल यापूर्वी आपण अर्ध मॅरेथॉनमध्ये धावलो आणि यंदा पहिल्यांदाच पूर्ण मॅरेथॉनमध्ये धावलो आणि तीही जिंकलो. त्यामुळे खूप आनंद झाला असल्याचे नीरजपाल यांनी सांगितले या स्पर्धेसाठी तीन महिन्यांपासून जोमाने सराव केल्यानेच हा विजय खेचून आणता आला.

कोई टिप्पणी नहीं: