शनिवार, 26 जुलाई 2008

मुंबईतील रेल्वे जमिनींचा पैसा महाराष्ट्रालाच

मुंबई, २६ जुलै-रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांच्याकडून महाराष्ट्रासाठी तब्बल ३६०० कोटी मिळवण्यात मुख्यमंत्री विलासराव देशमुख शुक्रवारी यशस्वी झाले.
मुंबईतील रेल्वेच्या जमिनींचा एफएसआय दोनऐवजी चार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने पूवीर्च घेतला होता. या निर्णयामुळे एफएसआयच्या विक्रीतून अंदाजे ३६०० कोटी रुपये मिळतील. त्यातील दोन तृतीयांश रक्कम मुंबईच्या विकासासाठी तर उर्वरित देशातील योजनांसाठी देण्याचे रेल्वेने तत्वत: मान्य केले होते. परंतु, महाराष्ट्रात एफएसआयमध्ये वाढ केल्यास सुमारे तीन लाख रुपये चौ. मीटर दराने सरकारतफेर् प्रीमियम आकारला जातो. रेल्वेला तो आकारण्यात आला नसल्याने एफएसआयमधून उभी राहणारी सर्व रक्कम जवळपास ३६०० कोटी राज्याच्या विकासासाठी वापरण्यास अनुमती मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली. लालूंनीही त्याला अनुमती दिली.

कोई टिप्पणी नहीं: