नवी दिल्ली, २६ जुलै - समाजातील दोन गटांमध्ये कटूता निर्माण करण्याच्या हेतूनेच स्फोट घडवून आणण्यात आले आहेत. नागरिकांनी या परिस्थितीत शांत राहावे, असे आवाहन पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी केले.
नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये. स्फोट घडवून आणणाऱ्यांचा कसून तपास करण्यात येत आहे. स्फोटांच्या पार्श्वभूमीवर, संपूर्ण देशातील सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें