मलकानगरी (ओरिसा)- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यानंतर नक्षलवादविरोधी पथकाचे ५० हून अधिक जवान बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे। हे जवान नावेतून परतत असताना चित्रकोंडाजवळ त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला। त्यामुळे नाव जलाशयात उलटली.
या नावेत एकूण ६४ जवान होते, त्यापैकी ८ जणांनी पोहत येवून आपला जीव वाचवल्याचे समजते.
ओरिसातील चित्रकोंडा हा दुर्गम तसेच नक्षलग्रस्त भाग असून याठिकाणी जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा नाही, त्यामुळे नाव हेच तेथे ये-जा करण्याचे एकमेव साधन आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें