मुंबई, १४ ऑगस्ट- मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याशी असलेल्या मतभेदामुळे आपल्या महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिलेल्या नारायण राणे यांनी आता आपल्या समर्थकांची जमवाजमव केली असून, ते स्वातंत्र्य दिनानंतर नवा पक्ष स्थापन करण्याची दाट शक्यता आहे.
मुख्यमंत्र्यांना कॉग्रेस पक्ष श्रेष्ठींनी पुन्हा एकदा अभय देत 'जुने ते सोने' हा पाढा राणेंपुढे वाचल्याने व्यथित झालेल्या राणेंनी आता बंडाचे निशाण फडकवण्याची तयारी सुरू केल्याचे समजते। राणे सध्या कोंकण दौऱ्यावर आहेत.
दरम्यान त्यांनी आपल्या समर्थकांची जमाजमव सुरू केली आहे। येत्या दोन दिवसांमध्ये राणे मुंबईत एक बैठकही घेण्याची शक्यता आहे.
राणे समर्थकांसह त्यांनीही या बाबतीत मौन पाळल्याने याला दुजोरा मिळत असून, राणेंच्या पाठीशी 30 ते 32 आमदारांचा फौजफाटा असल्याचे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. या आमदारांची संख्या पाहता राज्यातील अनेक पक्षांना राणेंनी सुरुंग लावण्याची तयारी पूर्णं केल्याचे दिसून येते.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें