अहमदनगर - स्थानिकांना डावलून परप्रांतियांना प्रवेश दिला जात असल्याचा आरोप करून त्याची माहिती घेण्यासाठी गेलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि येथील अहमदनगर महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये मंगळवारी हाणामारी झाली. कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मंगळवारी सकाळी साडेअकरा ते एकच्या दरम्यान हा प्रकार घडला.
नगर महाविद्यालयात शहरातील विद्यार्थ्यांना डावलून मिझोराम आणि अन्य राज्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश दिला जात असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाच्या जिल्हा संघटक ऍड. अनिता दिघे यांनी केला. याची माहिती घेण्यासाठी महाविद्यालयात गेल्यावर प्रवेशासाठी नेमलेल्या काही दलालांनी आणि कर्मचाऱ्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप दिघे यांनी केला.
दरम्यान महाविद्यालय सुरू असतानाच हा प्रकार घडल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. घटनेनंतर महाविद्यालय बंद करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून महाविद्यालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें