रविवार, 24 अगस्त 2008

मेटे यांचे केतकरांना आव्हान

मुंबई, २४ ऑगस्ट- ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्यावरील हल्ल्याचे आपण कधीच समर्थन केले नाही, मात्र असे हल्ले करण्याची पाळी का येते, याचाही विचार झाला पाहिजे, असे सांगत 'छत्रपतींचा अवमान केला नसल्याचे केतकर यांनी सिद्ध करून दाखवावे', असे आव्हान शिवसंग्राम पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे माजी उपाध्यक्ष विनायक मेटे यांनी शनिवारी दिले. तसेच, शिवस्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करून स्मारकाचे काम पावसाळा संपताक्षणी सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली.
' पत्रकारांवर यापूवीर् शिवसेनेने, आरपीआय तसेच नारायण राणे यांच्या कार्यर्कत्यांनीही हल्ले केले आहेत. या हल्ल्यांसाठी बाळासाहेब ठाकरे, राणे किंवा आरपीआयच्या नेत्यांवर कधीही गुन्हा नोंदवला गेला नाही. माझ्यावर मात्र गुन्हा नोंदवण्यात आला. आमच्याच पक्षाचे राज्य असताना कसलीही शहानिशा न होता अशा प्रकारे गुन्हा नोंदवला जाणे हा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या निष्पक्षपातीपणाचा पुरावा आहे', असा टोलाही त्यांनी हाणला.
पवार काय भूमिका घेतात, यानुसार आपण आपल्या राजकीय वाटचालीचा निर्णय घेऊ, असे त्यांनी शिवसेनाप्रवेशाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ठाणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदासंदर्भात आरोप करणाऱ्या नगरसेवक प्रताप सरनाईक यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली. मग केतकर हल्ल्याप्रकरणी आपल्याविरोधात बोलणाऱ्या पक्षातील नेत्यांवर कारवाई का झाली नाही, असा सवाल त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जीतेंद आव्हाड यांचे नाव न घेता केला.

कोई टिप्पणी नहीं: